तहसिलदारांसह,उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे सिन्नर तहसिलवर निवेदन
ज्ञानेश्वर काकड | नाशिक
सिन्नर तालुक्यातील शिव पादंन शेत रस्ता कृती समिती व शेतकरी बांधव यांच्याकडून तालुक्यातील शिवपांदण रस्ते खुले करण्यासाठी उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांसमवेत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात अनेक विषय मांडण्यात आले होते राज्यातील सर्व जिल्हयांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या समस्या यासह शेतकरी शेतीमधील कमी होणार्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, शेतीपुरक व्यवसाय व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे, तसेच शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या वाटेची आवश्यकता असते.
शिव, पानंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव, शेत व पानंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करावी या बाबत सूचना देखील केल्या आहेत परंतु तहसील कार्यालयांसह संबंधित विभागांकडून शेतकर्यांची होणारी अवहेलना थांबवण्यासाठी राज्यातील शेवटच्या शेतकर्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेत शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या वतीने करण्यात आला असुन अनेक शेतजमिनी शेतरस्त्याअभावी पडीक पडत चालल्या असुन अनेक फौजदारी स्वरूपांच्या घटनाही समोर येत असुन रस्त्याअभावी शेतकर्यांना कवडीमोल किमतीने शेतजमीनी विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली असुन अर्ज बनवण्यापासून ते कोर्टाच्या अंतीम निकालापर्यंतचा शेतकर्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी शिव पाणंद शेतरस्ता कृती समितीने सिन्नर तहसिलदारांना निवेदन देवून बैठक घेवून तालुक्यातील शिव पानंद शेतरस्ते तातडीने खुले करण्यासाठी शासननिर्णयाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्या तहसिल कार्यालयकडे केल्या आहेत यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर काकड, ड.संगीता उगले ,रामनाथ काळुंगे,सुनील डोली,मारुती काकड,संजय आव्हाड,ज्ञानेश्वर तुपे,बाळासाहेब चकणे,अरुण विंचू ,किरण विंचू, आनंदा उगले, केशव उगले, निवृत्ती उगले,अशोक मुठाळ,संजय हराळे,बाळासाहेब उगले,नंदू सातपुते,बापू उगले,रवींद्र कापडी,चंद्रकांत पालवे,शिवराम पालवे, हरिभाऊ पालवे ,भीमचंद पालवे ,खंडू आव्हाड उपस्थित होते.
शिव,पानंद शेत रस्त्यांची मोजणी व हद्द निश्चित नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये शेतरस्त्यांमुळे निर्माण होणारे वाद वाढत चालले असून ११ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयाच्या अंमलबजानीसाठी प्रशासकीय न्यायालयीन जनआंदोलन,जनजागृतीद्वारे शेतकर्यांच्या संघर्षला पुर्णविराम देण्याच काम महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातुन करत राहणार असुन शेवटच्या शेतकर्याला दर्जेदार शेरस्ता मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही
शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळ).