महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या २८८ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली आहे. मतदार राजा सत्तेत असलेल्या महायुतीला कौल देणार की महाविकास आघाडीला निवडणार आहे हे मतमोजणीदरम्यान स्पष्ट होईल. सध्याच्या अपडेटनुसार महायुती ७० ते महाविकास आघाडी ५० जागांवर आघाडीवर आहे.
राज्यातील मतदार सत्तेची चावी कोणाच्या हातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यंदाच्या पोल एक्झिटमध्ये कोणाचेच एकमत पाहायला मिळाले नाही. काहींनी महायुतीच्या पारड्यात अधिक जागा टाकल्या तर काहींनी महाविकास आघाडीला अधिक मते मिळतील असे भाकीत केले. त्यामुळे यंदाची ही निवडणूक जबरदस्त ठरणार आहे.