किल्ले धारूर : प्रधानमंत्री घरकुल योजनेचा हप्ता न मिळाल्याने लाभार्थ्यांनी संतप्त होत धारूर पंचायत समितीत जावुन घरकुल विभागाच्या अधिकार्यासह महिला कर्मचार्यांना पाऊन तास कोंडले . पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयात बसुन असतानाही मला माहित नसल्याचे सांगत हात झटकले .गटविकास अधिकारी दालनातून बाहेर आल्यानंतर घरकुल विभागाला लावलेले कुलूप उघडून कर्मचार्यांना बाहेर काढले .
प्रधानमंत्री घरकुल योजनेत धारूर तालुक्यात ५ हजार घरकुलांना मंजुरी मिळाली होती .या योजनेतील घरकुलांचा पहिला हप्ता हा शासनाने २२ फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या संबंधित विभागाला सूचना होत्या .परंतु २२ फेब्रुवारी ३ हजार ७०० लाभार्थ्यांनाच हप्ता जमा करण्यात आला होता .उर्वरित लाभार्थी पहिला हप्ता मिळण्यासाठी पंचायत समितीच्या घरकुल विभागाला मागील दीड महिन्यापासून खेटे मारत होते .यानंतर उर्वरित ५०० लाभार्थ्यांचा हप्ता ३१ मार्चपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता .यातील ७०० च्या जवळपास लाभार्थी पहिल्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत .यामध्ये तालुक्यातील सर्वच गावांचा समावेश आहे .लाभार्थी पंचायत समितीमध्ये खेटे मारूनही हप्ता पडत नसल्यामुळे संतप्त झाले होते .मंगळवारी सकाळी घरकुलाच्या हप्त्यासाठी पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांनी गर्दी केली होती .अखेर पंचायत समिती विभागातील कर्मचारीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आल्यानंतर लाभार्थ्यांनी संतप्त होऊन घरकुल विभागाच्या महिला लिपिक यू . बी . सय्यद व ऑपरेटर गोपाळ पाळवदे यास त्यांच्या दालनामध्ये कोंडून बाहेरून कुलूप लावण्यात आले .दुपारी दोन वाजता या विभागाला कुलूप लावण्यात आले होते .यावेळी गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे हे मात्र त्यांच्या दालनात होते .कुलूप लावून पाऊन तास झाले तरीही त्यांना मात्र कसल्याही प्रकारे खबर नव्हती .या संदर्भात माहिती घेण्यासाठी पत्रकार गटविकास अधिकारी यांच्याकडे गेले असता मला या संदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली .त्यांनी नंतर बाहेर येत लाभार्थ्यांना समजावत कर्मचार्यामार्फत कुलूप उघडण्यात आले .कोंडलेल्या दोन्ही कर्मचार्यांना नंतर बाहेर काढण्यात आले .यामुळे पंचायत समितीमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते .गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांचा वचक कर्मचार्यावर नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे लाभार्थी बोलत होते .घरकुल विभागातील कर्मचारी चिरीमिरी घेतल्याशिवाय हप्ता टाकत नसल्याची तक्रार ही गटविकास अधिकारी यांना लाभार्थ्यांनी लेखी दिली आहे.