spot_img
5.2 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

spot_img

गुडन्यूज ; पीएम किसानचा २२ वा हप्ता बँकेत जमा

पंतप्रधान किसान योजनेचा २२ हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात काल जमा करण्यात आला आहे. एकूण ९.३२ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात १८,६४५,१८२,६०० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या आनंदात भर पडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकर्‍यांना १,८३७ कोटींचे वितरण करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात २०२५ मध्ये तुफान पावसाने बॅटिंग केली. या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले. मात्र आता शेतकर्‍यांच्या खात्यात पंतप्रधान योजने मार्फत राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात एकूण १,८३७ कोटींची रक्कम थेट जमा झाले आहेत. या निधीमुळे शेतकर्‍यांना बियाणे, खते, औषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चांसाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल. शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकर्‍यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

थेट लाभ हस्तांतरणाच्या ई- वितरण पद्धतीमुळे (डीबीटी) माध्यमातून ही मदत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी झाले होते. विधानभवन समिती कक्षातून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वित्त राज्यमंत्री ड. आशिष जयस्वाल, कृषी विभाग प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव लेखा व कोषागारे रिचा बागला दूरदृश्य प्रणाली द्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशातील शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. या २२ व्या हप्त्यात २.१५ कोटीहून अधिक महिला शेतकरी लाभार्थ्यांनाही आर्थिक मदत मिळाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

ताज्या बातम्या